लखनऊ|धार्मिक प्रार्थना स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh government) कडक पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) सरकारने काढलेल्या आदेशानंतर १७ हजार भोंग्यांचा (sound of 17,000 horns has decreased) आवाज कमी झाला आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कायदा) यासंदर्भातील माहिती दिली आहे. भोंग्यासंदर्भात राज्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याचे अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्री कृष्ण जन्मभूमी येथील भोंगेही हटवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात असलेल्या भागवत भवन येथील कळसावर भोंगे लावलेले होते. इथे एक ते दीड तास मंगलाचरण आणि विष्णू सहस्त्रनाम वाजवले जाते . हे आता थांबवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात १२५ ठिकाणचे भोंगे हटवण्यात आले आहेत. तर १७ हजार ठिकाणी लोकांनी स्वतःहून भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. अलविदा नमाज बद्दल सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. शांती समितीच्या बैठका होत आहेत, असं ते म्हणाले.श्री कृष्ण जन्मभूमी मंदिरातील भोंगे (the horns at Shri Krishna Janmabhoomi have also been removed) हटवण्यात आले, तर गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरातील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. याशिवाय कानपूर, लखनऊ, नोएडा आणि अन्य शहरांतील (Kanpur, Lucknow, Noida and other cities) धार्मिक स्थळांवरील भोंगेही हटवण्यात आले आहेत. तर इतर भोंग्याचा आवाज उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आला आहे.