At MNS's Gudipadwa rally, Raj Thackeray had made a serious allegation that anti-social activities were taking place in mosques and madrassas. It has been demanded that Raj Thackeray should be handcuffed under UAPA Act. Therefore, the question of the role of the BJP will be important in political circles as the central government has the power to file charges under the UAPA Act, even if there is a possibility of a MNS-deprived dispute in the near future.

What is the role of BJP:… यूएपीए कायद्यांतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा!

मुंबई ।मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात  राज ठाकरे यांनी मशीद, मदरसेमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचा गंभीर आरोप केला होता.त्यावर  वंचित बहुजन आघाडीच्या  प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी याबाबत संतप्त भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत(File a case against Raj Thackeray under UAPA Act) गुन्हा दाखल करून बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे (MNS)  आणि वंचित असा वाद रंगण्याची शक्यता असली तरी  यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने भाजपची (BJP) भूमिका काय हा प्रश्न राजकीय वर्तुळात महत्वाचा  ठरणार आहे.


(opens in a new tab)
 गुढीपाडव्याला शनिवार(दि. 2 एप्रिल)रोजी शिवाजी पार्क येथील मैदानात राज ठाकरे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी ( shivsena NCP ) आणि काँग्रेसवर(CONGRESS)  सडकून टीका केली. भाजपच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीचे समर्थन केले. मशीद आणि मदरशांमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचाही यावेळी आरोप केला. या भाषणानंतर राज ठाकरेंवर महाविकास आघाडी सरकारकडून टीकेची तोफ डागली जात आहे तर भाजपने कौतुक केले आहे.मात्र  महाविकास आघाडी सरकारबरोबरच   वंचित बहूजन आघाडीने देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.सोमवारी सुजात आंबेडकर यांनी मशिदीवरील भोंगा काढण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा, असे आव्हान देऊन राज ठाकरे यांना डिवचले. आता वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी थेट राज ठाकरेंना   अटक करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात मनसे आणि वंचित असा वाद रंगण्याची दाट  शक्यता निर्माण झाली आहे.  रेखा ठाकूर  म्हणाल्या की, राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशीद  अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत. तेथे चौकशी करावी आणि काही तथ्य आढळल्यास त्यांना जबाबदार धरून मशीद, मदरसे समितीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. मात्र, तसे काही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत, विद्वेष पसरवणाऱ्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर  यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.मात्र यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने, केंद्रातील मोदी सरकार पर्यायाने भाजपची  भूमिका काय राहील हाच प्रश्न राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे. भाजपकडून अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. परिणामी यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला थारा अजिबात मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. 
 
कुठल्या प्रकरणात यूएपीए दाखल होऊ शकतो… 

भारताचं अखंडत्व, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या गोष्टींवरून  यूएपीए   लावला जातो. नेमक्या कोणत्या गोष्टींवर  यूएपीए  लावला जाईल, हे ठरलेलं नाही.1967 मध्ये हा कायदा अमलात आला आणि त्यानंतर या कायद्यात 6 हून अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या. पण प्रत्येक सुधारणेत हा कायदा आणखीनच कडक होत गेला.  यूएपीए  सारखा कायदा एखाद्या व्यक्तीवर लागणं म्हणजे त्यातून सहजासहजी त्याची सुटका होणं शक्य नाही. 2004, 2008, 2012 आणि 2019 मध्ये या कायद्यात महत्वाच्या सुधारणा झाल्या. पण त्या सगळ्यात वादात सापडलेली सुधारणा ती म्हणजे 2019 मधली. 2019 पर्यंत  यूएपीए   हा संघटनांवर लागत होता, कुठल्या एका व्यक्तीवर नाही. पण 2019 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी  या कायद्यात सुधारणा करत संघटनांसोबतच एखाद्या व्यक्तीवरही  यूएपीए  लावण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली. कारण एखाद्या संघटनेवर  यूएपीए   लावून त्या संघटनेचं काम थांबू शकतं, मात्र  त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती मात्र दहशतवादासंबंधी त्यांची कट-कारस्थानं सुरूच ठेऊ शकतात, त्यामुळे व्यक्तीवरही यूएपीए  (UAPA Act) लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. याला राज्यसभेत विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतरही हे बिल पास झालेले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *