मुंबई|
उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवू, त्यामुळे पंचवीस वर्षे मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या.अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही,अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मला ’माजी मंत्री म्हणू नका’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील हे राजकीय विरोधक असले तरी ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत. आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत .
पाटील म्हणतात, मला माजी मंत्री म्हणू नका. ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो; पण त्यांना काल निरोप पाठवला आहे की, पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला माजी म्हणूनच राहावे लागेल. नागालँडचे राज्यपाल होणार असल्याची माहिती मला मिळाली आहे.असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.