Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

Tweet of Nana Patole: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

मुंबई। पाच राज्यातील निवडणुकांमधील अपयशावर काँग्रेसच्या ‘हायकमांड’मध्ये मंथन होत असताना, महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आगामी सत्तेची स्वप्ने पडत आहे. देशापासून राज्यांमध्ये काँग्रेसचे मताधिक्क्य घटत असताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Next Chief Minister of Maharashtra is the Congress.) हा काँग्रेसचाच या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (  Nana Patole) यांच्या ट्विटने (  Tweet) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिणामी महाविकास आघाडीत बिघाडीची ‘काडी’ की, भाजपकडून महाविकास आघाडीवर सातत्याने  होणाऱ्या टीका भरकटविण्यासाठी ही राजकीय खेळी आहे का यावरही राजकीय वर्तुळात चर्चा होत असली तरी नाना पटोले यांच्या या ‘ट्विटर बॉम्ब’मुळे खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षात देशभरात काॅंग्रेस कायम पराभवाला सामोरे   जात आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत काॅंग्रेसला मोठे अपयश आले. पंजाब सारखे हक्काचे राज्य ही काॅंग्रेसने गमावले. त्यानंतर काॅंग्रेसमधील   असंतुष्टांचा गटही आक्रमक झाला होता. त्यातच  काॅंग्रेस वर्किंग कमेटीने मॅरेथाॅन बैठक घेत पुढील  वाटचालीवर चर्चा केली. सध्या तरी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यात आला असला तरी काॅंग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचा प्रश्न आणि चर्चा दोन्हीही  वाढत आहे.

गोवा आणि 4 राज्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढला आहे. भाजपने आता आधी मुंबई महापालिका आणि सोबतच महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचे मनसुबे जाहिर केले आहेत. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. महाविकास आघाडीला धक्के देण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. तसेच केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातुन काॅंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना कोणत्याना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर कायम काॅंग्रेस राहीली आहे. या पार्श्वभूमीवर  आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असे ट्विट केले आहे.    एकीकडे महाविकास आघाडी भाजपला सत्तेपासुन रोखण्यासाठी एकत्रित  निवडणुका लढवण्याचा मनसुबा व्यक्त करत असताना नाना पटोले मात्र कायम स्वबळाची भाषा करत असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आहे का हा प्रश्न तूर्तास महत्वाचा ठरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *