The budget session of the state legislature got off to a stormy start. The budget session begins with the Governor's address. However, Governor Bhagat Singh Koshyari interrupted his speech within minutes. The Governor himself interrupted the speech as it was announced by the authorities during the Governor's address. The governor interrupted his speech in just 22 seconds, put it on the table, and left.

The ruling aggressor: 22 सेकंदात भाषण थांबवून राज्यपाल निघून गेले

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातच   वादळी झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपते घेतले. सत्ताधाऱ्यांनीच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेतले. राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदात आपले भाषण आटोपते घेत, पटलावर ठेवले आणि निघून गेले.

अभिभाषणासाठी सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या 22 सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवले. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, पण त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.

‘त्या’ वक्तव्याचे पडसाद 

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचे पडसाद   विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *