maharashtra politics shivsena ncp sharad pawar congress

संघर्ष पेटला:​राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून

मुंबई​।​

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे​. ​ त्यातच आता ​ राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्षही पेटला आहे​.​ शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली​. ​ राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला​. ​ त्यामुळे पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत​. ​ अशी ​टीकेची तोफ  गीते यांनी ​डागल्याने  त्याला आता राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे​. 
जरी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष ​ पेटला ​असला तरी गीते आणि तटकरे यांच्यातील राजकीय ​वैर  पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे.

श्रीवर्धनमध्ये ​  माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ही टीका केली होती​. ​ त्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की​,​ 2014 आणि 2019 च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या ​अनंत गितेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षाचे नेतृत्वाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आली​,​ तेव्हा तो गळून पडला होता​. ​ अलीकडच्या काळात ​ गिते यांची राजकीय अवस्था ​’​सांगता येत नाही आणि सहनही होत नाही​’​​,​ अशी झाली आहे​. ​ त्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त ​वक्तव्य आले आहे​.  असं मला जाणवत आहे​. ​ ते ​  बोलल्याने काही फरक पडत नाही​. ​ सूर्यावर ​थुंकण्याचा हा प्रकार आहे​. ​ शरद पवार हे देशाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे जनक आहेत​. ​ त्यामुळे अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचे भान राहिले नसेल म्हणून त्या ​नैराश्यापोटी  आलेले ते​ वक्तव्यं  असू शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *