BJP people in Maharashtra are spreading discourses on democracy. This is good news. Devendra Fadnavis remembers democracy. They now discuss democracy. This is a good thing for Maharashtra and for democracy as a whole. It is a good thing that they remember democracy in Maharashtra when the Central Investigation Agency is being misused and pressure is being exerted on the opposition in all the states.

Sanjay Raut:तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना  महाराष्ट्रात   लोकशाहीची आठवण 

मुंबई ।महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) लोक लोकशाही विषयी प्रवचन झाडत आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis remembers democracy) यांना लोकशाही आठवते.  ते आता लोकशाहीची चर्चा करतात. ही महाराष्ट्रासाठी आणि एकूणच लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, सगळ्या राज्यातील विरोधकांवर दबाव इतके सगळे करत असताना महाराष्ट्रात (MAHARASHTRA) त्यांना लोकशाहीची आठवण येते, ही एक चांगली बाबत म्हणावी लागेल.अशा शब्दात शिवसेनेचे ( SHIVSENA ) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे ‘पोस्टमार्टेम’ केले आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी   भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले, तो वेडा माथेफिरू हनुवटीवर सॉस लावून येतो.  राष्ट्रपती राजवट लावा, असे म्हणतो. अशा मूर्खाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यांच्या ओठावरची जखम एका दिवसांत गायब पण होते? त्याची कोणती निशाणी राहत नाही. हे सगळे ढोंग आहे, अशा शब्दात   राऊत  यांनी किरीट सोमय्या  यांचा समाचार घेतला आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *