BJP people in Maharashtra are spreading discourses on democracy. This is good news. Devendra Fadnavis remembers democracy. They now discuss democracy. This is a good thing for Maharashtra and for democracy as a whole. It is a good thing that they remember democracy in Maharashtra when the Central Investigation Agency is being misused and pressure is being exerted on the opposition in all the states.

Sanjay Raut:एमआयएमची छुपी युती ज्यांच्यासोबत आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो!

मुंबई|  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस  ( SHIVSENA NCP CONGRESS )या तीन पक्षाचे सरकार राज्यात राहणार असून ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे, त्यांच्यासोबत युती होणार नसल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत(  Sanjay Raut)यांनी एमआयएमसोबतच्या ( MIM) युतीची शक्यता फेटाळली लावून आहे. महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दाखवली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष छत्रपती  शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. त्यांची छुपी युती ज्यांच्यासोबत आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो, असेही राऊत यांनी म्हटले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
भाजपची एमआयएम ही बी टीम असल्याचे राऊत यांनी सांगितले. एमआयएमची भाजपसोबत छुपी युती आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *