This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

OBC reservation case: ‘तारीख पे तारीख ‘,आता 2 मार्चला सुनावणी

नवी दिल्ली।
 संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ओबीसी (OBC) आरक्षणाबाबतची सुनावणी   पुन्हा  एकदा पुढे  ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचे म्हटल्यामुळे आता बुधवारी 2 मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी  होणार आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार राज्य सरकारने आरक्षण लागू करण्याची परवानगी मागितली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात   28 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याच सुनावणीवर अवलंबून होते.ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे. राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज 40 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण 39 टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या डेटाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यास आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.

17 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठीची ( OBC) त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही, असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यात पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातील म्हणूनच गृहित धरल्या जाव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *