MP Udayanraje Bhosle: Today the country is in the hands of perverted people, the next front is on Azad Maidan!

MP Udayanraje Bhosle:आज देश विकृत लोकांच्या हाती, पुढील मोर्चा आझाद मैदानावर!

रायगड ।देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचा आदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार   उदयनराजे भोसले  यांनी दिला आहे.शिवाय   राज्यपालांचे (Governor) समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे. राज्यपालांवर कारवाई व्हावी, यासाठी आता पुढील मोर्चा आझाद मैदानात काढू, अशी घोषणा देताना आज देश विकृत लोकांच्या हाती गेल्याचे प्रतिपादन  उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosle)यांनी केले. 

‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले   रायगडावर आले  त्याप्रसंगी  शिवरायांच्या समाधीला वंदन करून मेळाव्याला संबोधित करताना उदयनराजेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. 

उदयनराजे भोसले  म्हणाले, आज चित्रपट, लिखाण तसेच भाषणांच्या माध्यमातून राजेंची विटंबना होत आहे.  वर काही जणांकडून त्याचे समर्थन करण्याचे धाडस दाखवले जात आहे. राज्यपालांना (Governor) असे म्हणायचे नव्हते, त्यांचा असा उद्देश नव्हता, असा बचाव केला जात आहे. या लोकांना लाज वाटली पाहीजे. शिवरायांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही.असेही त्यांनी यावेळी बजावले. 

कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचा विषय संपवा, असे आवाहन उदयनराजेंना केले आहे. त्यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे. तसेच, भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, वेळ पडल्यास शक्य ते सर्व करायला मी तयार आहे.

 काही जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतरही या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. आणि आम्ही मुग गिळून पाहत बसलो आहोत. हीच आमची चूक झाली. राजेंचा अपमान झाला म्हणून आम्ही केवळ प्रतिक्रिया देत आहोत. आम्ही प्रतिक्रिया वादी झालो आहोत. अनेक जणांकडून राजेंबाबत काहीही बोलण्याचा प्रमाद घडतोय. मात्र, आपल्या ते अंगवळणी पडत चाललय. हीच आपली चूक आहे.असेही ते म्हणाले.

 शिवरायांनी समाजासाठी स्वत:च पूर्ण आयुष्य वेचले. आज त्यांचा अवमान होत असताना संपूर्ण महाराष्ट्र काय गप्प बसून राहील काय? शिवरायांच्या अवमानानंतरही बरेच जण गप्प बसले आहेत. आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाले आहेत. या स्वार्थामुळे देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही.याकडेही उदयनराजे भोसले यांनी लक्ष वेधले. 

आता जागा दाखवण्याची वेळ आलीय 

राज्यपाल हे सन्मानाच पद समजले जाते. मात्र, या महोदयांकडून सातत्याने महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांचा अवमान केला जात आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची खिल्ली उडवण्यापर्यंत राज्यपालांची मजल गेली. आम्ही हे पाहात बसू काय? भगतसिंह कोश्यारी हे मोठे माणूस कधीच नव्हते. आता तर शिवरायांचा त्यांनी एकदा नव्हे दोनदा अवमान केला. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले, अशा सर्वांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे.असेही  खासदार उदयनराजे भोसले यांनी   स्पष्ट करताना आता जनजागृतीसाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले.(MP Udayanraje Bhosle: Today the country is in the hands of perverted people, the next front is on Azad Maidan!) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *