मुंबई ।राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) फार लक्ष देऊ नका आणि त्यांना महत्त्वही देऊ नका. योगी आदित्यनाथांचा उल्लेख ठग, टकलू असा राज ठाकरेंनी वारंवार केला होता. आता अचानक त्यांना योगी आदित्यनाथ (feeling respect for Yogi Adityanath)यांच्याविषयी आदर वाटू लागला आहे.अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे (SHIVSENA) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली नाही, तोच शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव (Shiv Sena spokesperson and MLA Bhaskar Jadhav criticized Raj Thackeray’s new role)यांनी राज ठाकरेंच्या नवीन भूमिकेवर टीका करताना, राज आता अयोध्येला जाऊन योगींच्या टकल्यावर शाई लावणार आहेत का? असा बोचरा सवाल विचारला आहे.
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी म्हटले आहे कि, राज ठाकरे (Raj Thackeray) हे परिवर्तनवादी नेते आहेत. परिवर्तनवादी यासाठीच की, कारण त्यांनी ज्यावेळी मनसेची स्थापना केली. तेव्हाचा झेंडा, पक्ष आणि विचार एकदा आठवून पहा. त्यानंतर ते गुजरातला गेले. तिकडे जाऊन मोदींच्या आंघोळीचे पाणी राज्यातल्या नेत्यांनी प्यायला हवं. इथपर्यंत त्यांची भाषा गेली.त्यानंतर ’लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून त्यांनी पुन्हा मोदींवर टीका केली.नंतर त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. त्यानंतर काय आदेश काढला तर मला कोणीही हिंदुहृदयसम्राट म्हणायचे नाही, मराठीहृदयसम्राट म्हणा. सध्या राज ठाकरे यांचे मीच हिंदुहृदयसम्राट अशा तोऱ्यात भाषणं सुरु आहेत. म्हणूनच राज ठाकरेंना मी परिवर्तनवादी भोंगा म्हणतो. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना राज ठाकरे गंजा म्हणजेच टकला म्हणाले होते. आता त्या टकल्यावर शाई लावायला ते अयोध्येला जात आहेत का? कोणत्या तोंडाने अयोध्येला जाऊन राज योगींचे कौतुक करणार आहेत. त्यांच्या टकल्यावर केस आले की काय हे पाहणार आहेत का? (Bhaskar Jadhav’s question to Raj Thackeray)असा बोचरा सवाल जाधव यांनी केला असून त्यांचा नाईलाज आहे. त्यांच्याकडे पर्याय नाहीये, म्हणून ते भाजपला (BJP) मदत करत आहेत याकडेही लक्ष वेधले आहे.