मुंबई। ‘खोक्यां’वरून शाब्दिक ‘गुद्द्यां’वर पोहचलेला आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात समेट घडविण्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना यश मिळाले असले तरी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मात्र माझ्याच एका फोन कॉलवर आमदार बच्चू कडू हे गुवाहाटीला गेल्याची ‘इनसाईड स्टोरी’ कथन केल्याने राजकीय वर्तुळात या ‘कबुलीनाम्या’ची चर्चा रंगत आहे.
मी स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना बोलावून घेतले होते . आम्ही दोघांशीही चर्चा केली. त्यावेळी रवी राणांनी मान्य केले की मी हे रागात बोललो, मला तसं बोलायचे नव्हते , कोणाला दुखवायचं नव्हते . पण माझ्याविरोधात बच्चू कडू यांनी काही वक्तव्य केली त्यामुळे मी हे रागात बोललो. बच्चू कडू यांनीही हे मान्य केले की मीही रागारागात बोललो.दोघांनीही मान्य केले की आम्ही केलेली वक्तव्य बरोबर नाहीत. आता दोघांनीही ठरवले आहे की विकासासाठी काम करायचे आहे. यात दोघांचही भलं आहे. त्यानंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आता हा विषय (now this topic is over)संपला आहे.