मुंबई ।राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये भाजपा (BJP) पहिल्या क्रमांकावर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना ( Shiv Sena)आता चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर लोकांकडून शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत आहे, त्यामुळे शिंदे यांचे बंड योग्यच होते, असा दावा भाजपचे (BJP) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP)शिवसेनेला संपवले असून शिवसेना पक्ष (shivsena) आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आता तरी शिवसेनेने डोळे उघडावे अशी टीका करताना एकनाथ शिंदे यांचे बंड किती योग्य होते हे आता स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.(purepolitics24.com)
ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने संपवले असून ही गोष्ट सत्य असल्याचे आताच्या आकड्यांवरून समोर आले आहे. एकनाथ शिंदे जे वारंवार सांगत होते, त्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे. आता तरी शिवसेनेचे डोळे उघडतील असेही शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात जनतेने भाजपला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आपण आभारी आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.(Ashish Shelar: Shinde’s rebellion is right, Thackeray’s Shiv is now fourth!)