पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (objectionable statements about Chhatrapati Shivaji Maharaj)करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांनाही आपल्या महाराष्ट्रात राहायचे नाही. त्यांनाही परत जायचं आहे. ते म्हणतात की अभी बस हो गया…. बस हो गाया… मुझे जाना है…. जाना है, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ((Ajit Pawar)यांनी ‘तो जाने दो…’ अशी भूमिका मांडताना राज्यपालांवरील कारवाईची थेट तारीखच सांगून टाकली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि विराेधी पक्षांकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.तसेच विविध सामाजिक संघटनाही राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यपालांवर पाच डिसेंबरनंतर कारवाई होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. पवार म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पाच डिसेंबर रोजी आहे. कदाचित पाच डिसेंबर रोजीचे मतदान झाल्यावर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.(Ajit Pawar on Bhagat Singh Koshyari)