मुंबई -रायगड। जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.अवधूत तटकरेंच्या पक्षप्रवेशाची बातमी ताजी असतानाच रायगडमध्ये उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांची (Uday Samant and Sunil Tatkare ) ‘बंद दाराआड’ चर्चा झाल्याच्या चर्चेवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना ‘गैर अर्थ काढून बोलू नका’ असे म्हटले आहे.
उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ही भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सामंत-तटकरे भेटीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चांना काही अर्थ नाही. मागे जिल्हा नियोजन समितीवेळी त्यांच्या मुलगी आदिती तटकरे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्या काळात काही कामे मंजूर झाली असतील, आता नवीन पालकमंत्री उदय सामंत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या आमदारांची मदत व्हावी यासाठीच ती भेट आणि चर्चा झाली असेल असे १०० टक्के माझे मत आहे. (Ajit Pawar: Samant-Tatkare ‘behind closed door’ discussion, don’t misunderstand) त्यामुळे या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका, असे पवार यांनी म्हटले आहे.