पुणे|
आघाडी सरकारमधील नेते स्वतःचे प्रश्न सोडविताना दिसत असुन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याशी माझे चांगले संबंध आहे. ते या महाविकास आघाडीच्या चक्रव्युहात अडकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी या सरकारमधुन बाहेर पडावे, अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athawale ) यांनी केले.
पुणे शहराच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांकरता ते पुण्यात आले होते. ( Ramdas Athawale on Pune Visit ) त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या सरकारी संस्थाचा आधार घेत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुणे महानगरपालिकेमध्ये 20 ते 25 जागा भाजपने आरपीआयला द्याव्यात. आरपीआयकडून बारा-तेरा नगरसेवक निवडून येण्याची हमी आम्ही देतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दलित पँथरचा पन्नासावा सुवर्णमहोत्सव असल्यामुळे देशभरात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीचे कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे.असेही ते म्हणाले.