पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award) गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी एखाद्या रस्त्याच नाव बदललं की विरोधक गोंधळ घालतात, अशा शब्दात विरोधकांना खडेबोल सुनावले.(pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event pune) या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar),काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातील भाषणाची सुरुवातच मराठीतून केली होती. महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी वंदन…पुण्याच्या पवित्र भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला म्हटले. शिवराय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, टिळकांची ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या या भूमीवर मला जो सन्मान मिळाला आहे, हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातील भाषणाची सुरुवातच मराठीतून केली होती. महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी वंदन…पुण्याच्या पवित्र भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला म्हटले. शिवराय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, टिळकांची ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या या भूमीवर मला जो सन्मान मिळाला आहे, हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे मोदी यांनी सांगितले.
टिळकांशी जी संस्था जोडली गेली आहे, त्या संस्थेद्वारे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य आहे आणि माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी देशातील 140 करोड जनतेला समर्पित करतो असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच या पुरस्कारासह जी रोख रक्कम मला मिळाली आहे. ती रक्कम मी गंगेला समर्पित करत आहे. पुरस्काराची रोख रक्कम मी नमामी गंगे योजनेसाठी दान करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी टिळकांचा गुजरातशी खास कनेक्शन असलेला किस्साही सांगितला आहे. स्वातंत्र्य संग्रामात लोकमान्य टिळक दीड महिने साबरमती तुरुंगात राहिले. अहमदाबादमध्ये त्यांना ऐकायला 40 हजार नागरीक आले होते. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल देखील होते. तसेच इंग्रजांनी राणी व्हिक्टोरीयाच्या जयंतीसाठी अहमदाबादमध्ये 1897 मध्ये व्हिक्टोरीया गार्डन बनवलं होतं. ब्रिटीश महाराणीच्या नावाने बनवलेल्या या पार्कमध्ये सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांची मुर्ती स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला होता. या दरम्यान सरदार पटेलांवर खूपच दबाव टाकण्यात आला, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण सरदार सरदार होते, मी माझे पद सोडून देईन पण मुर्ती तिकडेच स्थापन करणार अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर मुर्ती बनली आणि 1929 मध्ये त्याचे लोकार्पण महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आल्याचा किस्सा मोदी यांनी सांगितला.याचवेळी त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावतानाच देशाच्या प्रगतीचा उल्लेखही केला. (pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event pune)
यावेळी नरेंद्र मोदी यांनी टिळकांचा गुजरातशी खास कनेक्शन असलेला किस्साही सांगितला आहे. स्वातंत्र्य संग्रामात लोकमान्य टिळक दीड महिने साबरमती तुरुंगात राहिले. अहमदाबादमध्ये त्यांना ऐकायला 40 हजार नागरीक आले होते. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल देखील होते. तसेच इंग्रजांनी राणी व्हिक्टोरीयाच्या जयंतीसाठी अहमदाबादमध्ये 1897 मध्ये व्हिक्टोरीया गार्डन बनवलं होतं. ब्रिटीश महाराणीच्या नावाने बनवलेल्या या पार्कमध्ये सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांची मुर्ती स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला होता. या दरम्यान सरदार पटेलांवर खूपच दबाव टाकण्यात आला, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण सरदार सरदार होते, मी माझे पद सोडून देईन पण मुर्ती तिकडेच स्थापन करणार अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर मुर्ती बनली आणि 1929 मध्ये त्याचे लोकार्पण महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आल्याचा किस्सा मोदी यांनी सांगितला.याचवेळी त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावतानाच देशाच्या प्रगतीचा उल्लेखही केला. (pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event pune)