The Supreme Court has ordered to hold local body elections in Madhya Pradesh with OBC reservation. However, it has been clarified that reservation should not be more than 50 per cent. As a result, the Shivraj Singh Chouhan government in Madhya Pradesh has been relieved. Fadnavis said the Maharashtra government had pointed the finger at the central government over the political reservation of OBCs throughout the year. The commission was then appointed; But they were not paid. He made some hasty reports in the Supreme Court and smiled to himself. The report submitted had no signature, no date and no data. In Maharashtra, the Mahavikas Vikas Aghadi government has killed the political reservation of OBCs in such a manner.

Devendra Fadnavis: ठाकरे सरकारकडूनच  महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या

नागपूर ।मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court has ordered)दिले आहेत. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे  असेही स्पष्ट करण्यात आले  आहे. परिणामी मध्य प्रदेशातील शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan government in Madhya Pradesh)सरकारला   दिलासा मिळाला  आहे.या पार्श्वभूमीवर  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारकडूनच   ‘महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या’ अशा शब्दात  टीकेची तोफ डागली आहे. 

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकारने  (Maharashtra government) वर्षभर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवले . त्यानंतर आयोग नेमला; पण त्यांना पैसे दिले नाहीत. सुप्रीम कोर्टात काही थातुरमातुर अहवाल सादर केले आणि स्वतःचे  हसू करून घेतले . जो अहवाल सादर केला त्यावर सही नव्हती, तारीख नव्हती आणि डेटाही नव्हता. महाराष्ट्रात अशा पद्धतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या महाविकास विकास आघाडी सरकारने केली आहे.

 … दुसऱ्या दिवशी समर्पित कमिशन तयार

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशातही ओबीसी (OBC)आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असा निकाल दिला होता. मात्र शिवराज सिंग चौहान सरकारने निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी समर्पित कमिशन तयार केले . त्या माध्यमातून मध्य प्रदेशातील स्थानिक प्रशासनामार्फत जिल्हानिहाय डेटा तयार केला. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने त्यांना आरक्षणासह निवडणुका घेण्याची संमती दिली याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.

जे  जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा 

आपल्याकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी फक्त राजकारण झाले. मंत्री भाषणं करत राहिले, मोर्चे काढत राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर यामध्ये कोणतेही लक्षच घातले  नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला एकीकडे संमती मिळाली तरीही महाराष्ट्राचा इम्पिरेकल डेटा तयार झालेला नाही. या सगळ्याला सरकारमधील  जे लोक जबाबदार असतील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *