ठाणे ।भोंग्याचे ‘राज’कारण गाजत असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अयोध्येला जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे गुऱ्हाळ उठले आहे. त्यातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंचे नाव पुढे करून भाजपावर (Devendra Fadnavis Slams Jayant Patil) निशाणा साधला आहे. मग काय प्रत्युत्तर म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे दाखले आता भाजपने (BJP) दिले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर देताना राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासोबत होते. ‘तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते ,गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलालयला लागले तर त्यांना खाजवायला होतंय. राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय’ .भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही.
राज ठाकरे (Raj Thackeray is going to Ayodhya) अयोध्येला जात आहेत. ते नेमकं कशासाठी जात आहेत, हे माहित नाही. मात्र, राज ठाकरे हे भाजपचे बाहुले बनून काम करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात केली होती. त्यावर प्रत्त्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला.
भारतीय जनता पार्टी सक्षम असून आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे. दररोज पोलखोल करतोय. त्यामुळे सरकार आणि सरकार मधील पक्ष व्यथित झाले आहेत. त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण आम्ही घाबरणार नाहीत. त्यांनी किती ही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.