नवी दिल्ली
एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच असावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे आणि राजकीय पक्षांना संसदेत ‘ त्या ‘ विधेयकावर गदारोळ करू नये अशी विनंतीही केली आहे.
दिल्लीतील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, 102 व्या घटना दुरुस्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्याला मागास घोषित करावं लागतं असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते . मागास घोषित करण्याचा सर्व अधिकार केंद्राचा आहे, राज्याचा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने एक अमेंडमेंड आणावे आणि स्पष्टीकरण द्यावे.त्यासाठी ही भेट घेण्यात आली आणि तशी विनंती करण्यात आली. केंद्र सरकार अशा प्रकारचे विधेयक संसदेत मांडत आहे ,त्यामुळे ते लवकरच मंजूर होईल. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.